केवळ हत्या न करणं ही अहिंसा नव्हे, इंद्रियांचे चोचले पुरविण्यासाठी हत्येला उत्तेजन देणं ही तर हिंसाच पण आपल्याला त्रास होतो म्हणून एखाद्या जीवाचा द्वेष करणे ही ही हिंसाच. तणनाशके, किटकनाशके वापरणे ही तर 'फार मोठी' हिंसा.वनं तोडणे/जाळणे ही ही हिंसाच. अर्थात जगायचं म्हणजे हिंसा अपरिहार्य आहेच. पण निदान आपल्याकडून मारल्या जाणाऱ्या जीवांना 'सद्गती' मिळावी अशी भावना तरी ठेवावी.
याचा अर्थ असा नाही की पशुपक्षी मारावेत, मांसाहार करावा, किटकनाशके-तणनाशके वापरावीत पण माझ्या मते शेतकऱ्यांनी पिक रक्षणासाठी, सैनिकांनी राष्ट्र रक्षणासाठी थोडी हिंसा केल्यास तो अपराध नाही(यासाठी 'भारतीय सनातन शास्त्रात पंचयज्ञ सांगितले आहेत).
तर एकूण असा निष्कर्ष काढायला आक्षेप नाही की माझ्या मते स्वधर्मासाठी अपरिहार्य हिंसा अवश्य करावी(धर्म यांचा मला मान्य अर्थ हिंदू(त्व), इस्लाम, ख्रिस्तियता नसून गुणधर्म शब्दातील धर्म किंवा वर्णाश्रमानुसार प्राप्त होणारा धर्म आहे).
जय शिवराय, जय सनातन!
Sunday, July 4, 2021
धर्म आणि हिंसा
Subscribe to:
Posts (Atom)