Monday, March 23, 2020

स्वदेशी:- कोरोनासारख्या विषाणूंच्या अटकावासाठी उपयुक्त

जागतिकीकरणाचे(खरंतर युरोपियकरणाचे) काही तत्कालिक लाभ दिसत असले तरी 'दूरगामी' त्यामुळे हानीच होणार आहे हे सध्याच्या परिस्थितीवरून 'सुज्ञांच्या' लक्षात आलं असेलच(न आलं असल्यास मी समजावून सांगत रहाणार नाही).
स्वदेशीची खरी संकल्पना आहे आपल्या वसतीस्थाना भोवतालच्या तीस कि.मी. परिसरातील वस्तूंचा उपयोग करणे. इतकं काटेकोर आत्ता अर्थातच शक्य नाही. पण आपल्या आवश्यकता(आहार, निवारा) तरी त्यातून उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्नशील झालं पाहिजे. सुदैवाने आज जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी तरी 'पथ' मुक्त आहेत. पण कधीतरी अशीही वेळ येऊ शकते की त्यासाठीही 'पथ' मुक्त नसतील. त्यावेळी जर आपण जर आपल्या आवश्यकतांसाठी 'बाहेरल्यांवर' अवलंबून नसणं आपल्या हिताचं होईल.
लक्षपूर्वक वाचणार्यांचे आभार, त्यानुसार आचरणार्यांना धन्यवाद!
'जय भारत जय जगत'!

Sunday, March 22, 2020

स्वदेशी आत्मनिर्भरता और उपवास(अनशन)! इनमे कुछ तो है 'खास' !

स्वदेशी का सही अर्थ अपने प्रदेशमे(३० किमि दायरेमे) होने वाली चिजेही लेना|  आज कोविड-१९ के पार्श्र्वभूमीपर इनकी महतता और अधोरेखित होती है| असलमे आप जैसे सुज्ञोको 'कैसे ये' बतानेकी आवश्यकता नही है| फिरभी कुछ शंकासुर मूर्खोंकेलिए थोडकेमे बताता हूं|
आज कोरोना के कारण यातायात बंद है|आयुर्वेद के नुसार(मैने वैद्योंसे जो सुना-पढा है, और इसकी मुझे खात्री है) स्वदेशी आरोग्यदायी भी है| इस वक्तमे हम अगर 'स्वदेशी व्रती' होते तो दिक्कते काफी हद तक कम होती| ऐसेही उपवास(अनशन)से हमे अन्नके बीना रहनेकी आदत हो सकती है जिससे हम विपरीत परिस्थितीमेभी जी सकते हैं| इसके सिवा उपवाससे आत्मिक और स्पिरीतुअल(spiritual) शक्तीयाभी मिलती है|
मुझे लगता है आपको समझानेकेलिए इतना काफी है| जय 'भारत', जय 'जगत'!

Thursday, March 19, 2020

मरावे परी...!

वाढत्या लोकसंख्येमुळे माझी आई (पूर्वी)कधीतरी म्हणायची साठ वर्षांवरील माणसांना मारून टाकलं पाहिजे. अर्थात ते आवेशात बोललं जायचं त्यामुळे त्यात काही फारसा अर्थ नसायचा. हे मला आज जो गोंधळ चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आठवलं. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी मृत्यूलोकात मरण हे आवश्यक आहे आणि टळणार नाही. त्यामुळे माणसांनी समजू लागल्यावर हळूहळू आपली संसार/प्रपंचातील आसक्ती कमी केली पाहिजे. सव्वाशे वर्षे अवश्य जगावं पण हेही समजून घ्यावं मरणाचा आपण जेवढा आनंदाने स्वीकार करू तेवढं आपल्यासाठीच चांगलं आहे(मला याची पूर्ण जाणीव आहे की मुलं/मुली 'लहान' असतानाचं मरण आनंददायी व्हावं असं म्हणणं केवळ चुकीचंच नाही तर राक्षसी आहे. मी जरा अवस्थेबद्दल बोलतोय). जर चांगलं जगायचं असेल तर व्यायाम, संयम, अपरिग्रह, योग्य(आध्यात्मिक) आहार-विहार हे सर्व आवश्यक आहे.