वाढत्या लोकसंख्येमुळे माझी आई (पूर्वी)कधीतरी म्हणायची साठ वर्षांवरील माणसांना मारून टाकलं पाहिजे. अर्थात ते आवेशात बोललं जायचं त्यामुळे त्यात काही फारसा अर्थ नसायचा. हे मला आज जो गोंधळ चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आठवलं. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी मृत्यूलोकात मरण हे आवश्यक आहे आणि टळणार नाही. त्यामुळे माणसांनी समजू लागल्यावर हळूहळू आपली संसार/प्रपंचातील आसक्ती कमी केली पाहिजे. सव्वाशे वर्षे अवश्य जगावं पण हेही समजून घ्यावं मरणाचा आपण जेवढा आनंदाने स्वीकार करू तेवढं आपल्यासाठीच चांगलं आहे(मला याची पूर्ण जाणीव आहे की मुलं/मुली 'लहान' असतानाचं मरण आनंददायी व्हावं असं म्हणणं केवळ चुकीचंच नाही तर राक्षसी आहे. मी जरा अवस्थेबद्दल बोलतोय). जर चांगलं जगायचं असेल तर व्यायाम, संयम, अपरिग्रह, योग्य(आध्यात्मिक) आहार-विहार हे सर्व आवश्यक आहे.
Thursday, March 19, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment