Sunday, October 4, 2020

मुलांवरही संस्कार हवेत

हिंदुस्थानात बलात्कार बंद व्हावेत असं मलाही वाटतं पण सर्वच पक्षांत गुंड, मवाली, अडाणी आणि अचरट नेत्यांचा भरणा असताना आणि सर्वच माध्यमं 'पक्षसापेक्ष' वृत्तांकन करत असताना ते शक्य नाही. कारण बलात्कार कोणत्याही मानवी जाती, पंथाच्या अगदी सुशिक्षित आणि सुसंस्कृत नराकडूनही घडू शकतो(मी सुशिक्षित सुसंस्कृत आहे असा दावा नाही पण तरीही सांगतो मला मातृदेवतेचा(आईचा) धाक नसता आणि आईवडीलांनी हवं तसं 'उंडारायला' दिलं असतं तर मीही बलात्कार केला असता).
आपण जेव्हा बलात्कार, बलात्कार म्हणून ओरडत असतो तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की मैथुनसुख घ्यावं असं बहुतांश नरांना (अणि पुरूषांनाही) वाटत असतं(मुलांवरही बलात्कार होतात असं ऐकलंय त्यामुळे अशा एखाद्या बलात्कार पिडिताला किंवा इतर काही कारणांमुळे या गोष्टीचा तिटकारा क्वचित एखाद्याला वाटू शकतो). आणि सध्या तरी क्लोनिंग सहज शक्य नाही आहे त्यामुळे 'वंश टिकवण्यासाठी' आणि 'सुप्रजननासाठी' नर-मादी या 'दोघांनाही सुखदायी' मैथुनाची आवश्यकता आहे.
आता मूळ मुद्द्याकडे येतो. काल एका 'आचरट भाजपीय भैयानं' सांगितलं की बलात्कार मुलींवर संस्कार नसल्याने होत आहेत. बरं तथाकथित बलात्कार मुलानं मुलीवरच केला आहे. मग तो 'संस्कारी' आहे का! अरे आचरटा मुलं-मुली दोघांवरही संस्कार आईबापानं केले पाहिजेत. दोघांचंही दायित्व आहे ते. त्यासाठी त्यांवर आधि संस्कार पाहिजेत. अधर्मी(निधर्मी/धर्मनिरपेक्ष) राष्ट्रात कसं शक्य होणार ते! त्यासाठी आपल्या या 'हिंदुराष्ट्राला' स(द्)धर्मी बनविलं पाहिजे. त्यासाठी रामायण, महाभारत, भागवत, श्रीकृष्ण चरित्र यांसारखे ग्रंथ अभ्यासक्रमात पाहिजेत. त्यामुळे सध्यातरी बलात्कार थांबणं अशक्य आहे.

No comments: