Sunday, May 17, 2026

भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलाय हिंदुस्थान!

मुघल आणि इंग्रज हिंदुस्थानात साम्राज्य स्थापन करू शकले कारण राजे आणि 'मंत्र्या'तील (छद्म)धनाचा लोभ अति झाला. त्यांची राज्य हिंदुस्थानात आता नसली तरी हिंदूतील लोभ नष्ट झाला नाही. त्यामुळेच सर्वत्र भ्रष्टाचार अधिक बोकाळला. आज तर एवढा भ्रष्टाचार वाढला आहे की कुणावरही चांगलं आहे असा विश्वास ठेवला की तेच तुमचा विश्वासघात करतात.
भ्रष्टाचार म्हटलं की आमच्या(सामान्य बुद्धीच्या जनांच्या) डोक्यात केवळ लाचलुचपत किंवा कर चुकवेगिरी येतात(किंवा शासकीय योजनांत मिळालेल्या वस्तू ढापणं). पण भ्रष्टाचार शब्द भ्रष्ट+आचार असा आहे. तुम्ही जर एखादी वस्तू विकत असाल आणि त्यात नसलेल्या गोष्टी आहेत म्हणून सांगणं किंवा असलेल्या हानिकारक गोष्टी(उदा. मैदा, चरबी द्रव्यसंरक्षक) न सांगणं हा ही भ्रष्टाचार आहे. आज अनेक आस्थापनं आपल्या उत्पादनात मैदा किंवा चरबी नाही म्हणून विज्ञापन करतात. पण त्यासोबत मैदा/चरबीयुक्त उत्पादनंही आणतात हा ही एक नियमांत बसणारा भ्रष्टाचार आहे.  एकूणच आपण भ्रष्टाचार व लोभाच्या तसेच (छद्म) विकासाच्या मोहाच्या विळख्यात अडकलो आहोत.
मी एकट्याने करून काय होणार!
आपल्या देशातील बहुतांश माणसं असाच विचार करतात. केवळ मी एकट्याने धर्माचरण करून काय होणार किंवा मी एकट्याने सत्यानं वागून काय होणार हेच नाही तर बचत संयम याबाबतही ते असंच 'थिंकतात'.पण कुणी तरी एकट्याने पुढाकार घेतल्याविना बदल होत नाही(म्हणून मी ठरवलं आहे, कुणी काही म्हणो, आपण सत्य-धर्म यांना सोडायचं नाही). छत्रपती शिवाजी महाराज, जनमान्य टिळक जन्मले नसते तर आपण विदेशी, विधर्मींच्या जोखडातून मुक्त झालो नसतो.
जय भारत, जय महाराष्ट्र, जय उत्तर भारत(प्रदेश)!

No comments: