कुठंतरी थोडंसं सांख्य(science) जाणणारे काही 'अपूर्व' ज्ञानी स्वत: फार मोठं वैज्ञानिक असल्याचं भासवितात(तसा प्रयत्न करतात). आणि शंकराचार्यांनी मांडलेल्या 'ब्रम्ह सत्यं जगं मिथ्या' या सिद्धांताची खिल्ली उडवितात. परंतु या 'अपूर्व' ज्ञानीनांही कधीतरी याची प्रचिती येतच असते पण 'केवळ मीच(तेच)' ब्रम्ह असा समज असलेले ते 'अपूर्व' ज्ञानी ते मान्य करत नाहीत.
आता काहींचा प्रश्र्न असेल ब्रम्ह जर आहे तर ते दिसत का नाही! याला उत्तर आहे माया. माया म्हणजे जे 'सत्य' लपवते आणि 'मिथ्या(असत्य नव्हे)' सत्य म्हणून भासविते. हिच्या प्रभावामुळे आपण 'मिथ्या संसारात(पैसा, पद, आभासी प्रतिष्ठा इ.)' सुख मानतो आणि त्यालाच सर्वकाही समजतो आणि त्यामुळेच 'सच्चिदानंदघन परमात्मा प्राप्तीच्या
सुखाला मुकतो.
(विशेष तळटीप: मला अध्यात्मात आस्था आहे याचा अर्थ असा नाही की मला विज्ञान, तर्कशास्त्र मान्य नाही. माझा 'तथाकथित साईबाबा' करत असलेल्या किंवा स्वामी समर्थ, टेंबे स्वामी गजानन महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती यांच्या नावावर खपविल्या जाणाऱ्या चमत्कारांवर विश्वास नाही. त्यातील तर्कसंगत असेल त्यावरच माझी 'श्रद्धा' आहे.)
शेवटपर्यंत वाचणाऱ्यांना आभार, धन्यवाद!
जयतु जयतु 'सिंधूराष्ट्र'!
Thursday, August 13, 2020
ब्रम्ह सत्यं, जगं मिथ्या!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment