(अस्विकरण: मी कुणी शास्त्रज्ञ(शास्त्री), वैज्ञानिक नाही. मी फार मोठा 'विद्लानही नाही. त्यामुळे माझे विचार (कु) तर्काच्या कसोटीवर तपासू नयेत).
सामान्यत: श्राद्ध वर्षातून दोन वेळा केली जातात. व्यक्तिगत श्राद्ध हे मृत व्यक्तीच्या चांद्रमासातील तिथीला केलं जातं तर महालय श्राद्ध हे सामान्यतः भाद्रपद/आश्विन कृष्ण पक्षात केलं जातं(याविषयी अधिक माहिती आपल्याला 'धर्म'शास्त्रज्ञ सांगतील).
आता वळूया विषयाकडे. तर अनैकांना श्राद्धविधीविषयी (कु)शंका असतात की जर मृतात्मा वेगळ्या लोकांत असैल तर इथं जनांना जेवायला घालून त्यांच्यापर्यंत पोचत कसं! ज्यांना मृतात्म्याच्या नावाने वाढलं जातं त्यात ते कसे येतात(बऱ्याच वेळा पुरोहितच या वेडगळ समजुतीला मोठं करतात).पुरोहितांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी 'शोधून काढलेला' विधी तर नाही ना! इ.
आता या शंकांची उत्तरं! तर जनांना वाढलेलं अन्न मृतात्म्यांस मिळत नाही. तर श्राद्धविधीचं पुण्य त्यांना मिळतं. अर्थात ज्यांना मृतात्म्यांच्या नावाने वाढलं जातं ते त्या जनांत येण्याचा प्रश्नच नाही. पुरोहितही केवळ श्राद्ध कसं करावं एवढंच सांगत नाहीत. त्यांनाही अनेक मार्ग आहेत उदरनिर्वाहासाठी! शिवाय सर्व पूजापाठात अनेक प्रकारच्या साहित्याची आवश्यकता भासते. त्यामुळे अनेकांना व्यवसाय मिळाले आहेत(यावर राजिवजींचं(मल्होत्रा नव्हे, दिक्षित!)छान व्यायाम आहे.
तर एकूण निष्कर्ष असा आहे श्राद्ध विधी एक विज्ञान आहे.
लक्षपूर्वक आणि शांतपणे वाचणाऱ्यांचे आभार आणि त्यांना धन्यवाद!
No comments:
Post a Comment