(महत्वाची शीर्षटीप: मी आडनावाचा देखील वैद्य नाही. जे वाचलं(आणि मुख्य म्हणजे अनुभवलं) त्या आधारे लिहीत आहे.)
पुष्कळ जनांना वाटतं आयुर्वेद ही एक चिकित्सा पद्धती आहे ज्यात केवळ वनस्पतीचे भाग वापरले जातात. पण तसे काही नाही. आयुर्वेदात बारा क्षार औषधी ही आहेतत, शस्त्रक्रियाही आहे. मुळात आयुर्वेद केवळ चिकित्सापद्धती नसून जीवन कसं जगावं याचं ‘शास्त्र’ आहे.
थोडं फार आयुर्वेदाविषयी जाणणारे कधी कधी म्हणतात की आयुर्वेदात कफ, वात पित्त यापलीकडे आहे काय! पण त्यांना हे माहित नसतं की आपण(ते) समजतो तेवढं क्षूद्र नाही आहे हे! आयुर्वेदात कफ, वात, पित्त आणि पंच महाभूते यांना ‘विश्वव्यापक’ अर्थ आहे. कफ, वातं, पित्त यांना त्रिदोष जरी म्हटलं तरी शरिराचा ते ‘अविभाज्य’ भाग आहेत. आपलं सगळं जीवनच नाही तर ‘वंशसातत्यही’ त्यांच्या प्रमाणावर अवलंबून आहे. तेव्हा आयुर्वेदाला ‘केवळ झाडपाल्याची औषधं’ नका समजू, आयुर्वेद ‘सुदृढ, निरोगी’ जीवन जगण्याची 'एकमेव' कला आहे.
No comments:
Post a Comment