केवळ हत्या न करणं ही अहिंसा नव्हे, इंद्रियांचे चोचले पुरविण्यासाठी हत्येला उत्तेजन देणं ही तर हिंसाच पण आपल्याला त्रास होतो म्हणून एखाद्या जीवाचा द्वेष करणे ही ही हिंसाच. तणनाशके, किटकनाशके वापरणे ही तर 'फार मोठी' हिंसा.वनं तोडणे/जाळणे ही ही हिंसाच. अर्थात जगायचं म्हणजे हिंसा अपरिहार्य आहेच. पण निदान आपल्याकडून मारल्या जाणाऱ्या जीवांना 'सद्गती' मिळावी अशी भावना तरी ठेवावी.
याचा अर्थ असा नाही की पशुपक्षी मारावेत, मांसाहार करावा, किटकनाशके-तणनाशके वापरावीत पण माझ्या मते शेतकऱ्यांनी पिक रक्षणासाठी, सैनिकांनी राष्ट्र रक्षणासाठी थोडी हिंसा केल्यास तो अपराध नाही(यासाठी 'भारतीय सनातन शास्त्रात पंचयज्ञ सांगितले आहेत).
तर एकूण असा निष्कर्ष काढायला आक्षेप नाही की माझ्या मते स्वधर्मासाठी अपरिहार्य हिंसा अवश्य करावी(धर्म यांचा मला मान्य अर्थ हिंदू(त्व), इस्लाम, ख्रिस्तियता नसून गुणधर्म शब्दातील धर्म किंवा वर्णाश्रमानुसार प्राप्त होणारा धर्म आहे).
जय शिवराय, जय सनातन!
Sunday, July 4, 2021
धर्म आणि हिंसा
Monday, May 10, 2021
कोरोना केवल निमित्त!
केवल खांग्रेसमेही अंग्रेजोके मानसिक दास है ऐसा नहीं है, भाजपा और राष्ट्रीय स्वयंसेवक संघमेभी अंग्रेजों के मानसिक गुलाम है(वरना वो अपने आपको रा. स्व. स कहलाते आर एस एस नहीं)। आज इसी वजह से हिटलर की तरह जिनपिंग को खलनायक बनाया जा रहा है। वरना अंग्रेज/युरोपीय/अमरिकी कतेह कमी नहीं। उन गोरे लोगों के आगे कोई जाएं तो उनको पेट दर्द होता है इसलिए उनके आंखों में मुसलमान खुंपते है, जिनपिंग खुपता है, किम जोंग खुपता है(और स्पष्ट कहे तो हिंदू भी खुपते है। कोरोना केवल निमित्त है, उनको मकसद तो चीन को खलनायक बनाना ही था।
मुसलमानों को 'समझदार' बनाने की आवश्यकता
मुसलमान चाहे हिंदुस्थान के हो या पापीस्थान(पाकिस्तान) के वो मुलत: हिंदूओंकेही वंशज है, वो मुलत: हिंदू ही है। असल में उनको फंसाकर या डरा-धमकाकर जबरदस्ती से मुसलमान बनाया गया है। लेकिन वो या तो ये बात भूल गए हैं या इसकी ऐमियत समझ नहीं रहे हैं। हमें(सनातनीयोंको) उनका लागुनचालन नहीं करना है लेकिन ये बात उनके 'गले' अवश्य उतारना है।
'जय सनातन, जय भारत'!
Thursday, October 8, 2020
सबसे बडा 'रोग', क्या कहेगे 'लोग'!
हम जीन चिजोंसे अनावश्यक ठरते है उनमें सर्वप्रथम है 'क्या' कहेगे लोग! लोगोंका क्या! कुछ तो कहते ही रहेंगे अगर आप कुछ भी न करें तोभी| लोंग क्या कहेंगे इसकी बहुत ज्यादा चिंता करके हम अपना जीना खो देते है| फिरभी सभी को हम संतुष्ट नहीं कर पाते| सचमुच! क्या कहेंगे लोग ये सोच बहुत ही बडा रोग है जो 'स्वयं' का घात करती है|
Monday, October 5, 2020
वनौषधी चहा
साहित्य: आलं, तुलसीपत्रे, गुलाब पाकळ्या, पारिजात पुष्पे, कोरफड, अपराजिता(गोकर्ण) पानं, पाणी, साखर/गूळ, (हवे असल्यास)दूध
कृती: १००/२०० मिली पाणी घेऊन त्यात १०/१५ तुलसीपत्रे, अपराजिता पानं (मिळाल्यास फुलं), गुलाब पाकळ्या, पारिजात पुष्पे घालावीत. आलं किसून घालावं. चांगलं उकळावं. कोरफडीची पात विस्तवात घालून गर काढून घ्यावा. चवीनुसार शक्यतो गूळ किंवा साखर घालावी. गाळून घेऊन दूध घालून प्यावं
Sunday, October 4, 2020
मुलांवरही संस्कार हवेत
हिंदुस्थानात बलात्कार बंद व्हावेत असं मलाही वाटतं पण सर्वच पक्षांत गुंड, मवाली, अडाणी आणि अचरट नेत्यांचा भरणा असताना आणि सर्वच माध्यमं 'पक्षसापेक्ष' वृत्तांकन करत असताना ते शक्य नाही. कारण बलात्कार कोणत्याही मानवी जाती, पंथाच्या अगदी सुशिक्षित आणि सुसंस्कृत नराकडूनही घडू शकतो(मी सुशिक्षित सुसंस्कृत आहे असा दावा नाही पण तरीही सांगतो मला मातृदेवतेचा(आईचा) धाक नसता आणि आईवडीलांनी हवं तसं 'उंडारायला' दिलं असतं तर मीही बलात्कार केला असता).
आपण जेव्हा बलात्कार, बलात्कार म्हणून ओरडत असतो तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की मैथुनसुख घ्यावं असं बहुतांश नरांना (अणि पुरूषांनाही) वाटत असतं(मुलांवरही बलात्कार होतात असं ऐकलंय त्यामुळे अशा एखाद्या बलात्कार पिडिताला किंवा इतर काही कारणांमुळे या गोष्टीचा तिटकारा क्वचित एखाद्याला वाटू शकतो). आणि सध्या तरी क्लोनिंग सहज शक्य नाही आहे त्यामुळे 'वंश टिकवण्यासाठी' आणि 'सुप्रजननासाठी' नर-मादी या 'दोघांनाही सुखदायी' मैथुनाची आवश्यकता आहे.
आता मूळ मुद्द्याकडे येतो. काल एका 'आचरट भाजपीय भैयानं' सांगितलं की बलात्कार मुलींवर संस्कार नसल्याने होत आहेत. बरं तथाकथित बलात्कार मुलानं मुलीवरच केला आहे. मग तो 'संस्कारी' आहे का! अरे आचरटा मुलं-मुली दोघांवरही संस्कार आईबापानं केले पाहिजेत. दोघांचंही दायित्व आहे ते. त्यासाठी त्यांवर आधि संस्कार पाहिजेत. अधर्मी(निधर्मी/धर्मनिरपेक्ष) राष्ट्रात कसं शक्य होणार ते! त्यासाठी आपल्या या 'हिंदुराष्ट्राला' स(द्)धर्मी बनविलं पाहिजे. त्यासाठी रामायण, महाभारत, भागवत, श्रीकृष्ण चरित्र यांसारखे ग्रंथ अभ्यासक्रमात पाहिजेत. त्यामुळे सध्यातरी बलात्कार थांबणं अशक्य आहे.
Sunday, August 16, 2020
कपडे आणि बलात्कार!
हिंदुस्थानात पुष्कळदा स्त्रियांचे कपडे आणि बलात्कार यावर चर्चा होत असतात. तथाकथित स्वयंघोषित संस्कृतीरक्षक सारा ठपका स्त्रियांच्या कपड्यावर ठेवतात तर तथाकथित स्वयंघोषित स्त्रीवाद्यांना तो त्यांच्या(स्त्रियांच्या) व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वाटतो पण दोघेही चुकीचाच विचार करतात(कसं ते खाली स्पष्ट करत आहे)
मैथुनेच्छा(सेक्सची इच्छा) ही मानवांसहित सर्व प्राण्यांची प्रकृती आहे पण त्यातून दुसऱ्याला दु:ख देऊन 'आपलाच काम' पुर्ण करणं ही झाली विकृती. तर आपल्या 'जोडीदाराला' आनंद देणं('कुणाला 'धोका' न देता) ही झाली संस्कृती. यासाठीच विवाह संस्था निर्माण करण्यात आली आणि कपड्यांचे शिष्टसंकेत निर्माण करण्यात आले. पण तरीही महिलांवर बलात्कार होतच राहिले. मानवी नरातील विकृती वाढतच राहिली(यात चलतचित्र निर्मात्यांनी बलात्कार हा जणू काही पराक्रम आहे अशा पद्धतीनं दृष्ये चित्रीत करुन 'मोलाची' भर घातली. ही झाली एक बाजू.
याची दुसरी बाजू ही की जरी कपडे पूर्ण आणि व्यवस्थित असले तरी बलात्कार होतात हे जरी खरं असलं तरी उत्तानक आणि मादक कपडे घातल्याने सत्पुरुषा़ंच्या मनातही दुर्वासना निर्माण होते. नराधमांना एक सबब मिळते. त्यामुळे स्त्रियांनी योग्य कपडे परिधान करणं हे त्यांसाठीच चांगलं.
Thursday, August 13, 2020
श्रमसंकार आवश्यक!
जन्मना जायते क्षूद्र, संस्कारात द्विजोच्चते असं एक शास्रवचन आहे. याचा शब्दशः अर्थ आहे कोणत्याही जातीत जन्माला आलं तरी आपण जन्मतः क्षूद्रच असतो, संस्कारांनी आपला दुसरा जन्म होतो. किती सुंदर आणि चांगलं वाक्य आहे हे!
तसे आपल्यावर कळत नकळत संस्कार होतच असतात पण मला आज प्रामुख्यानं लिहायचं आहे ते (शारिरीक)श्रमसंस्काराबद्दल.
सिंधुस्थानात पूर्वी विद्यार्थी गुरुघरी राहून विद्यार्जन करायचे, गुरुसेवा आवश्यकता होती त्यामुळे आपसूकच शारिरीक श्रम व्हायचे, (शारिरीक)श्रमांची सवय लागायची पण इंग्रजांनीं नियोजन आणि 'परिश्रमपूर्वक' गुरुकुलं नष्ट केली, 'भारतीयत्व' नसलेली 'लेखापाल' उत्पादक 'मेकाल्ले' शिक्षणपद्धती दृढ केली आणि आम्ही मानसिक दास बनलो. आम्हाला शरीरश्रम करणं कमी बुद्धिमतेचं वाटू लागलं(खेळण्याला मी श्रमात गणत नाही आहे). शेतात काम करणं कमीपणाचं वाटू लागलं. आपल्या अपत्यांना 'आयतं' मिळवून देण्यात धन्यता वाटू लागली आणि इथंच सगळी गडबड झाली. बालपणी (शारिरीक)श्रमांची सवय न लागल्याने ज्या़ना 'पांढरपेशी' चाकऱ्या मिळाल्या नाहीत अशा माझ्यासारख्यांना शरिरश्रम करणं फारच अवघड जाऊ लागलं
पण झालं ते झालं. आतातरी माझ्या अपत्यवान मित्रमैत्रिणींनी आपल्या अपत्यांना श्रमसंस्कार देऊन उपकृत करावं ही मित्रत्वाच्या नात्यानं कळकळीची नम्र विनंती.
शेवटपर्यंत वाचणाऱ्यांचे आभार, धन्यवाद!
जयतु जयतु सिंधूराष्ट्र!