Tuesday, August 14, 2018

जगतोय कशासाठी!

तुमच्यापैकी कुणाच्या मनात विचार येतो का हो? बहुतेक येत नसेलच. आपण सारे पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा कमावण्याच्या मागे इतके लागले एवढं कमवून तरी आपण सुख(अंती) कमावतो आहोत की नाही याचा विचार करायला आपल्याकडे वेळ नाहीय.
आज अनेकांकडे चिक्कार पैसा आहे, दागिने आहेत, साधनं आहेत पण उसंत आहे का? कुणी विचार करतोय का नैतिक-अनैतिक मार्गांचा वापर करून हे कमवतोय पण मृत्यूनंतर काय उपयोग आहे त्याचा! कोणी म्हणेल संतानाला होईल पण संतान याचा उपभोग घेईलच याची शाश्वती आहे का? खोटया इंग्रजीपणाच्या अहंकारापायी आपण निसर्गाला राबवत आहोत त्याचं शोषण करत आहोत याचा परिणाम आपल्या वंशावर निश्चितच होणार आहे मग कशासाठी हे करायचं! जरा शांतपणे विचार करा. आपल्या सनातन भारतीय संस्कृतीकडे(सभासंसने सांगितलेली नव्हे) वळा. त्यातच आपलं हीत आहे.
जय श्रीराम, जय श्रीकृष्ण!

No comments: