Monday, August 20, 2018

परोपकराय पुण्याय ...पण कोणासाठी!

इतर पंथ/संप्रदाय आणि वैदिक पंथ/संप्रदाय(ज्यामध्ये वैदिक तत्वज्ञान शिल्लक आहे) तसेच बौद्ध, जैन यामध्येही अहिंसा, परोपकार याला पुजापाठापेक्षा जास्त महत्व दिलं जातं. भागवतधर्माचं सार काय तर कृष्णद्वैपायन व्यासांची दोन वचनं परोपकराय पुण्याय आणि पापाय परपीडणम.
पण ही दोन्ही वचनं एकत्रित घ्यायची आहेत नाहीतर परोपकार करताना आपण परपीडण करू. वाघाची भूक भागविण्यासाठी गायीचा बळी द्यायचा का ! तर नाही(जी गोमाता आपल्यावर अनंत उपकार करते प्रसंगी तिचा जीव वाचविण्यासाठी खरंतर आपण प्राणांचाही बळी दिला पाहिजे पण भेकडपणा आड येतो).(हे केवळ उदाहरण म्हणून घ्यावं, मी गोपालक/रक्षक नाही की समर्थक नाही).
असो, तर मुद्दा काय परोपकार करावा पण परपीडण न करता.

No comments: