सामान्य माणूस हा चमत्कार तिथं नमस्कार करणारं असल्यानं पुराणात चमत्कार पेरले आहेत पण पुराणं ही मानवजातीला शिक्षण देणारी आहेत. यातीलच एक भागवत महापुराण. त्यात सुरवातीलाच(१८ वा अध्याय) परिक्षिताला मिळालेल्या शापाची कथा आहे. त्यावरच आजचं हे लिखाण.
(भागवतानुसार)परिक्षित गोब्राम्हणप्रतिपालक होता, पराक्रमी होता पण लुबाडून घेतलेल्या धनातून बनविलेल्या मुकुट घातल्याने त्याला शिकार करण्याची दुर्बुद्धी झाली. त्यावरही 'कळस' म्हणजे ध्यानस्थ ऋषींच्या गळ्यात त्यानं सर्प घातला. आणि यातूनच शृंगी ऋषींचा श्राप त्याला मिळाला.
ही झाली कथा. पण यातील बोध म्हणजे ब्राह्मण(बुद्धिवंत) आणि क्षत्रिय(बलवंत) हे(सर्वच वर्ण) जेव्हा परस्परांचा आदर करतात तेव्हाच राज्यकारभार सुरळीत होतो.
Saturday, February 15, 2020
भागवतबोध १
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment