Tuesday, February 18, 2020

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी स्वदेशी आणि ग्रामस्वराज्य !

(विसू:- हे प्रेषण खांग्रेसींनी आणि गांधी शब्दाचं अपथ्य असणार्यांनी वाचू नये. वाचून मळमळल्यास किंवा उलटी वगैरे झाल्यास उत्तरदायी हेमंत वसंत गोरे नाही.)
स्वदेशीची संकल्पना 'विदेशी' वस्तू न वापरणं एवढीच संकुचित नाही. तर स्वदेशी म्हणजे आपल्या जास्तीत जास्त आवश्यकता पूर्तीसाठी स्वदेशात(सुमारे ३० कि.मी) परिसरातच तयार होणार्या वस्तूंचा उपयोग करणं( मोहनदास गांधींचं विदर्भात असं एक घर आहे जे त्यांनी ५००रू. मधे बांधून घेतलं असं मी एका लघुचलतचित्रात ऐकलंय). ग्रामस्वराज्य म्हणजे गांव कमीत कमी परावलंबी असणं हे आपल्याला समजत असेलच. ही दोन्ही तत्व भ्रष्टाचार नगण्य करण्यासाठी निश्चितच उपयुक्त आहेत.
इंग्रज आणि मुस्लिम राज्य येण्यापूर्वी हिंदुस्थानातील गावं(खेडी) स्वयंपूर्ण होती. गावकऱ्यांना आवश्यक गोष्टी गावातच तयार होत, गावकरीच करत त्यामुळे टेंडर(अमराठी शब्दाबद्दल क्षमस्व!)चा प्रकार नव्हता.तथाकथित 'विकासकामांसाठी' बाहेरून माणसं येत नसल्याने अधिकार्यांना चिरिमिरी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसे. सरासरी प्रत्येक गावात एक गुरूकुल होतं ज्यात सर्व जातीवर्णांचे विद्यार्थी शिक्षण घेत(संदर्भ: रमणीय वृक्ष आणि इतर धर्मपाल साहित्य). गुरूदक्षिणा नंतर दिली जाई त्यामुळे शिक्षणाचा नावाखाली होणारा भ्रष्टाचारही नव्हता. मुळात ' माणूस म्हणून असणार्या' बहुतेक आवश्यकता गावातच पूर्ण झाल्यामुळे भ्रष्टाचार करायला साधनंच कमी होती.
सध्याच्या काळात या गोष्टी अवलंबणं कठीण आहे हे मलाही समजतं. पण आपण प्रयत्न तर करू शकतो. आणि हो 'दिर्घकालीन' विचार करता याचा लाभ आपल्यालाच आहे. त्यामुळे इतरांकडे 'अंगुलीनिर्देश' नको.

No comments: