Saturday, September 20, 2025

ओळख षड्रिपूंची: मोह

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत ४था आहे मोह! मोह म्हणजे आकर्षण, सापेक्ष छद्म (भासमय) प्रेम/माया! (रामायणात उभार)क्षणभराच्या मोहामुळे सीतेला बंदिवास घडला. तथाकथित रामानं सीतेचा त्याग खरा मानला तर याला कारणही सीतेला झालेला मोह. या मोहाची बहिण आहे माया(आई,बहिण किंवा वहिनीची नव्हे, तर आभास). माया आणि मोह यांमुळे इतिहासात अनेक वाईट गोष्टी घडल्या आहेत.
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Friday, September 19, 2025

ओळख षड्रिपूंची: लोभ

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात  सांगितलेल्या षड्रिपूत ३रा आहे लोभ! कामाप्रमाणे हाही मेल्यानंतरही असतो. लोभ म्हणजे हाव आणि संग्रहवृत्ती(कंजूसपणा). हा रिपू असणं{माझ्या मते) आवश्यक नसलं तरी तो असतोच हे सत्य आहे.
आज जगापुढे ज्या समस्या आहेत त्याचं कारण लोभच आहे छद्म(व्यावहारिक) धनाच्या लोभापायी सध्या मानववंश राक्षसं होऊन भूमाता, निसर्गदेवता यांचं शोषण करत आहे(अलिकडे त्याला विकास हे गोंडस नाव दिलं आहे).लोभामुळे पृथ्वी एक दिवस 'निर्जीव' होईल की काय अशी भिती वाटत आहे.
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Thursday, September 18, 2025

ओळख षड्रिपूंची: क्रोध!

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे.)
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत २रा आहे क्रोध!  मराठीत याला राग असंही म्हणतात. क्रोध हा आपल्यात तसा असतो पण सुप्तावस्थेत! जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घडतं किंवा काम पुरा होत नाही तेव्हा क्रोध येतो. क्रोघ काहीसा आवश्यक आहे. पण 'जास्तीचा' क्रोध दुसऱ्याचाच नाही तर स्वतःचाही घात करतो. म्हणून स्वभावात क्रोध असावा पण जेवणात कसं 'तिखट' जास्त झालं की तोंड पोळतं तसंच क्रोधाचंही आहे 
मला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्ष देऊन वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Wednesday, September 17, 2025

ओळख षड्रिपूंची: काम!

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे.)
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत १ला आहे काम! खरं तर काम हा असा शत्रू आहे की जो जीवाच्या जन्मा अगोदरपासून तर असतोच असतो पण मेल्यानंतरही असतो(असा माझा विश्वास आहे). या कामाची ओळख आपण करून घेऊ.
आपण सर्वांचा जन्म हा कामातूनच झालेला आहे. मग तो काम कधी पुत्राचा किंवा कन्येचा असेल किंवा 'क्षणिकही' असेल. पण जग 'चालण्यासाठी काम आवश्यक आहे हे (काही जणांसाठी)कटू असलं तरी सत्य आहे. त्यामुळे कामाचं 'निर्मूलन करण सर्वसामान्यच नव्हे तर ऋषिमुनिंनाही शक्य नाही(कामाचं निर्मूलन करावं अशी 'कामना' करणं हाही एक काम आहे हाही एक भाग आहेच). 
तर बुद्धिवंताच्या आता लक्षात आलं असेलच की काम हा आत्म्याप्रमाणेच अनादी=अनंत आहे. पण अनियंत्रित काम(ना) शत्रू आहे. तो तुमचाच नाही तर पूर्ण वंशाचा ही नाश करू शकतो. म्हणून काम नष्ट नाही पण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. माझं घर मोठं असावं, वाहन आरामदायी असावं ह्या कामासाठी जीवन खपवू नये.
मला वाटतं काम या रिपूची एवढी ओळख पुरेशी आहे.
लक्ष देऊन वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Friday, August 22, 2025

श्राद्ध: एक विज्ञान!

(अस्विकरण: मी कुणी शास्त्रज्ञ(शास्त्री), वैज्ञानिक नाही. मी फार मोठा 'विद्लानही नाही. त्यामुळे माझे विचार (कु) तर्काच्या कसोटीवर तपासू नयेत).
सामान्यत: श्राद्ध वर्षातून दोन वेळा केली जातात. व्यक्तिगत श्राद्ध हे मृत व्यक्तीच्या चांद्रमासातील तिथीला केलं जातं तर महालय श्राद्ध हे सामान्यतः भाद्रपद/आश्विन कृष्ण पक्षात केलं जातं(याविषयी अधिक माहिती आपल्याला 'धर्म'शास्त्रज्ञ सांगतील).
आता वळूया विषयाकडे. तर अनैकांना श्राद्धविधीविषयी (कु)शंका असतात की जर मृतात्मा वेगळ्या लोकांत असैल तर इथं जनांना जेवायला घालून त्यांच्यापर्यंत पोचत कसं! ज्यांना मृतात्म्याच्या नावाने वाढलं जातं त्यात ते कसे येतात(बऱ्याच वेळा पुरोहितच या वेडगळ समजुतीला मोठं करतात).पुरोहितांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी 'शोधून काढलेला' विधी तर नाही ना! इ.
आता या शंकांची उत्तरं! तर जनांना वाढलेलं अन्न मृतात्म्यांस मिळत नाही. तर श्राद्धविधीचं पुण्य त्यांना मिळतं. अर्थात ज्यांना मृतात्म्यांच्या नावाने वाढलं जातं ते त्या जनांत येण्याचा प्रश्नच नाही. पुरोहितही केवळ श्राद्ध कसं करावं एवढंच सांगत नाहीत. त्यांनाही अनेक मार्ग आहेत उदरनिर्वाहासाठी! शिवाय सर्व पूजापाठात अनेक प्रकारच्या साहित्याची आवश्यकता भासते. त्यामुळे अनेकांना व्यवसाय मिळाले आहेत(यावर राजिवजींचं(मल्होत्रा नव्हे, दिक्षित!)छान व्यायाम आहे.
तर एकूण निष्कर्ष असा आहे श्राद्ध विधी एक विज्ञान आहे.
लक्षपूर्वक आणि शांतपणे वाचणाऱ्यांचे आभार आणि त्यांना धन्यवाद!

Thursday, August 21, 2025

हिंदू धर्म आणि 'बामनी' हस्तक्षेप!

खरं तर हिंदू(त्व) हे धर्म नसून एक 'जाती' आहे. ज्याला हिंदू धर्म म्हटलं जातं तो 'विकृत' सनातन धर्म आहे. पण सध्या हिंदू धर्म हा शब्द प्रचलित असल्याने मी तोच वापरत आहे.
हिंदू धर्मात जे काही वाईट होतं, आहे(अधर्मी, अधर्मइच्छक, साम्यवादी आणि फुरोगाम्यांच्या) मते त्याचं खापर येऊन फुटतं ते बामनावर! मग ते रचणारा किंवा लिहीणारा बामन असो वा नसो! मनुस्मृतीचंच घ्या ना! मनू हा राजा होता आणि राज्यकारभार व्यवस्थितरीत्या चालावा म्हणून जो ग्रंथ रचला तो मनुस्मृती! अलिकडे तर काय, हिंदू आणि ब्राह्मण(बामन) वेगळे आहेत असा भन्नाट शोध लावणारे महाभाग/गा समाजमाध्यमांत आढळतात. एकीकडे तर मी वाचलं की यज्ञवंशिय वैदिक ब्राह्मणांनी नाग म्हणून मातीच्या प्रतिकृतीची पूजा करायला सुरुवात केली. यांचं इतिहासाचं एवढे 'अपूर्व' ज्ञान बघून मी तर थक्क झालो. खरं तर मूर्तिपूजा हा मूळ वसनातन धर्माचा भाग नव्हे, ती नंतर सुरू झाली. आणि यज्ञ म्हणजे केवळ होमहवन नव्हे. समाज हितासाठी केलेलं कोणतंही काम यज्ञ असतं. अर्थात 'विज्ञानशास्त्रीय'होमहवन हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे यात शंका नाही.पण यज्ञ या शब्दाचा अर्थ संकुचित घेणे योग्य नाही.

Saturday, June 21, 2025

योग, आयुर्वेद आणि मानसिक दास्यत्व(गुलामगिरी)!

(गोरे)युरोपिय इंग्रज हिंदुस्थान सोडून गेले. पण जाताना हिंदुस्थानचे तुकडे करून आणि थोडे आपले वैचारिक 'लाल' सोडून गेले. मुघलांनी(आणि युरपिय इंग्रजांनी सुद्धा) जेवढी भारतीय संस्कृतीला हानी पोचवली नाही तेवढी हानी त्यांच्या आणि इंग्रजांच्या (वेचारिक) संकरित 'लालांनी पोहचवली.
खरं तर संस्कृत वैज्ञानिक शास्त्रीय भाषा आहे. पण स्वातंत्र्यानंतरही अत्यंत घाणेरड्या अशा आंग्ल भाषेत (छद्म)विज्ञान शिकविलं गेलं. अभियंते, चिकित्सक होण्यासाठी इंग्रजी येणं आवश्यक बनलं. एरवी महात्मा(?) गांधीच्या नावाचा उद्घोष करणाऱ्या 'खान्ग्रेसी' लाल आणि छद्म गांधींनी याबाबत मात्र महात्मा गांधीजींना पद्धतशीर 'खुंटीवर बसवलं'. योग, आयुर्वेद या सत्य आणि 'दिव्य' शास्त्रांना जेव्हा आंग्लांच्या जनुकीय वंशजांनी 'डोक्यावर घ्यायला' सुरुवात केली तेव्हा अनिच्छेने का होईना पण वैचारिक आंग्ल-मुघलांना त्याचं 'महात्म्य' काही प्रमाणात का होईना मान्य करावंच लागलं. पण तरीही या शास्त्रांना अजुनही दुय्यम स्थान आहे.
खरं तर आज योग आणि आयुर्वेद म्हणून शिकवलं जातं ते त्या शास्त्राचा(योग आणि आयुर्वेद हे खरं तर अभिन्न आहेत) अत्यंत छोटा अंश आहे. आणि मला नाही वाटंत या शास्त्राच्या तथाकथित अभ्यासकांना याचा मूळ अर्थ आणि तत्व माहित आहेत. ते केवळ यां विज्ञानशास्त्राकडे उपचार पद्धती म्हणून पहातात. पण खरं तर योग आणि आयुर्वेद या योग्य रितीने जगण्याच्या 'व्यवस्थां'चं शास्त्र आहे.